shayari on love
कोणी गेलं म्हणून , आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं ... जगायचं असतं प्रत्येक क्षण , उगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नसतं ... आठवणींच्या वाटांवरून आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं असतं ... आभाळापर्यंत पोहोचता येत नसतं कधी , त्याला खाली खेचायचं असतं ... कसं ही असलं आयुष्य आपलं , आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं ... दिवस तुझा नसेलही , रात्र तुझीच आहे . त्या रात्रीला नवीन स्वप्नं मागायचं असतं ... तुझ्याच वेड्या श्वासांकडे थोडं जगणं मागायचं असतं ... खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे . खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे . खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे . खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे . खरं प्रेम म्हणजे … तू अणि मी , कायम जवळ असण शोधत असतो मी तुला तुझ्या नेहमीच्याच वळणांवर आणि आजकाल असतं फक्त शोधणं ...